धाराशिव (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींनी बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचा लाभ देण्याची एकमुखाने मागणी केली आहे. यासाठी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार कैलास पाटील तसेच आमदार प्रवीण स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संयुक्तरीत्या पत्र दिले आहे.
या पत्रामध्ये, बंजारा समाजाला सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी आरक्षणाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून हैद्राबाद गॅझेटमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना ST प्रवर्गात आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, एका स्थानिक बातमी पत्रानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील याबाबत भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “सरकार बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक आहे आणि लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल.”
यामुळे बंजारा समाजामध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments